आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज

 


आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज


आपल्या असामान्य गुणांमुळे जनमानसांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते आणि यापुढेही कायमच घेतले जाईल. आज महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांचे काही गुण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. महाराजांचा हा समृद्ध वारसा आपण पुढच्या पीढीपर्यंतही पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे.  बहुगुणी महाराजांचे गुण हे पुढच्या पीढीसाठी नक्की मार्गदर्शक आहेत...

  शिवाजी महाराजांच्या स्वधर्माविषयी प्रचंड निष्ठा आणि आदर होता. तरीही देखील त्यांनी कधीही इतर धर्मांचा तिरस्कार किंवा अनादर केला नाही. त्यांच्या सैन्यात हिंदूंप्रमाणे मुस्लिम मावळेही होते. आजच्या काळात धर्म सहिष्णुता , हा महत्त्वाचा गुण महाराजांनी जोपासला होता. अनेकाविध लढाया झाल्या नक्कीच त्या मुस्लिम साम्राज्याच्या विरोधात होत्या निजामशाही आदिलशाही कुतुबशाही आणी मुघल साम्राज्यानी स्वराज्य वेढलेला  होता मग लढाया त्यांच्याशीच होणार ना पण असे असतांना महाराजांनी आपल्या सैन्याला ताकिद होती लढाईत कोणत्याही मशिदी अथवा कुराणचा अपमान होता कामा नये. 

आज मला महाराजांच्या राज्यभिषेकाचा एक गोष्ट सांगाविशी वाटतेय महाराजांच्या राज्यभिषेकाची रायगडावर तयारी सुरु होती मोरोपंत पिंगळे त्या सर्व तयारीचे नियोजन करत होते आणी तयारी बघण्यासाठी महाराज रायगडावर आले आणी मोरोपंतानी सगळी तयारी दाखवली राज्यभिषेकासाठी चौथरा, राजेंच्या विश्रांतीसाठी महाल,  आऊ साहेबांसह सर्वाचे प्रशस्त महाल , सुर्यदेवाचे मंदिर आदि सर्व पाहिल्यानंतर न राहुन शेवटी महाराजांनी विचारले सगळी तयारी ठिक आहे मोरोपंत पण माझ्या मुस्लिम प्रजेसाठी मशिद कुठे आहे  मोरोपंतानी मान खाली घातली महाराजांनी तत्क्षण आदेश दिला आणी महाराजांच्या महालासमोरच मशिद बांधायला सांगितली एवढचं नव्हे तर अफजलखानाच्या वधानंतर रायगडाच्या पायथ्याशी त्याची मशिद बांधणारे महाराज अव्दितीयचं असतील 

कोणत्याही संकटात, अडचणीत न डगमगणारे महाराज आणि त्यांच्या साहस कथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालोत. कधी शक्ती तर कधी युक्तीच्या जोरावर यशस्वीरित्या साहस कसे करावे, हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे. देश, स्वराज्य आणि काम यांच्या प्रती कशी निष्ठा असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छञपती शिवाजी राजे. महाराजांची हीच निष्ठा आज जर आपण आपल्या दैनंदिन कामात आणली तर यशाकडे होणारी आपली वाटचाल कोणीच रोखू शकणार नाही. आजकाल स्त्रियांवरील वाढते अत्याचार, शोषण हे पाहता आता स्त्री स्वातंत्र्यासोबत स्त्रीयांचा आदर करा हे सांगावे लागत आहे. अशा काळात महाराजांकडून शिकवण नक्कीच पुढील पीढीला देऊ शकतो. कल्यानच्या सुभेदाराच्या सुनेला पाहुन आईची उपमा देणारा शिवछञपतीचं 'स्त्रियांचा सन्मान कायम राखला पाहिजे मग ती कुणीही असो' अशी महाराजांची भूमिका होती. महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीही थारा दिला नाही.शिवाजी महाराजांचा अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे नेतृत्व. हातात अधिकार असताना सर्वसमावेशक विचार करणे, इतरांना सोबत घेऊन पुढे जाणे, कुठेही दुजाभाव होऊ न होणे असे आदर्श नेतृत्व पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. महाराजांनी उभं केलेलं 'स्वराज्य' हे सांघिक भावनेचं (टीमवर्कच) बेस्ट उदाहरण आहे. कुठे, कधी कुणाची गरज आहे. कुणाला पुढं करायचं, सोबत घेऊन काम कसं करायचं. आहे त्या टीमच्या साहाय्याने विजयश्री कशी प्राप्त करायची हे महारांजांनी अनेकवेळा दाखवून दिलंय. कारण सांघिक भावनेमुळेच अनेक कामे सोपी होतात, लवकर होतात. आचार-विचारांची देवाण घेवाण होते. म्हणून आज मि आर्वजुन सांगु इच्छितो महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतले तर या शिवस्वराज्याचे गोमटे झाल्याशिवाय राहणार नाही असो

असा हा सर्वसमावेशक राजास तिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर , विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे शिवछञपतींना मानाचा मुजरा


                   - अँड. पंकज गायकवाड




 

No comments

Powered by Blogger.